राज्यातील महापालिका निवडणुका बाबत मंत्री अनिल परब काय म्हणाले, वाचा…

0

पुणे :  कोरोना नियंत्रणात राहिल्यास महापालिकांच्या निवडणुका नियोजित वेळेतच होतील. राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील असं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे पूण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील कोरोना (Corona) प्रदूर्भाव कमी होत आहे. म्हणून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी फिरताना नियमांचे पालन करावे.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास उद्योग, व्यावसाय, दळणवळण पूर्ण क्षमतेने सुरू होऊन राज्य प्रगतीपथावर येण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियमांचे पालन करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.