दिल्लीतील शरद पवार यांच्या बैठक नक्की कश्यासाठी

0

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रमंच संघटनेने ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजकीय मंचच्या नेत्यांव्यतिरिक्त विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनीही राष्ट्र मंच अंतर्गत भाग घेतला.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, भाकप, आप, राष्ट्रीय परिषद, आरएलडी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खलबतं सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती.

ही बैठक संपल्यावर माजिद मेमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, शरद पवारांनी ही बैठक बोलावली नव्हती. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलवली होती. काँग्रेसला आम्ही वेगळे सोडले हे चुकीचे आहे. काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. राजकीयदृष्ट्या कोणताही कार्यक्रम नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणत्याही निर्णयासाठी बैठक बोलावली नव्हती.

बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, यशवंत सिन्हा, पवन वर्मा, डी राजा, ओमर उब्दुल्लाह, जस्टिस ए पी शाह, जावेद अख्तर, अॅडवोकेट माजिद मेमन, खासदार वंदना चव्हाण, सुधेंद्र कुलकर्णी, अरूण कुमार, अर्थशास्त्रज्ञ, निलोलपाल बासू, माजी खासदार सीपीएम, जयंत चौधरी, घनश्याम तिवारी, समाजवादी पार्टी, बिनॉय विश्वास, खासदार, सुशील गुप्ता, आम आदमी पार्टी आणि के. सी. सिंग आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.