औरंगाबादचे नाव “संभाजीनगर”; मंत्रिमंडळाने दिली मान्यता

0

मुंबई : ठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अनेक दिवसापासून मागणी असलेल्या औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव “संभाजीनगर” करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

उस्मानाबाद शहराच्या ”धाराशीव” नामकरणास मान्यता.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.

कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार

शिवसेनेत पहिला उठाव कुणी केला हे बंडखोर आमदार गोगावलेंनी नाव घेऊनच सांगितले…

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय

महाविकास आघाडी सरकारवर सध्या अडचणीत आहे. राज्यापालांनी गुरुवारी बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्या विरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.