किरकोळ वादातून चाकूने हल्ला करत मित्राचा खून

0

पिंपरी : बांधकाम मजुरांमध्ये पत्ते खेळताना वाद झाला. त्या वादातून एका कामगाराने तिघांवर चाकूने हल्ला केला. त्यात एकाचामृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार, दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास लक्ष्मीपुरा, देहूरोड येथे घडली.

सखाराम विश्वनाथ मरकाम (25, रा. विजयपूर, जि. बिलासपुर, छत्तीसगढ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर जोधियाविश्वनाथ मरकाम (23, रा. विजयपूर, जि. बिलासपुर, छत्तीसगढ), संजय हरबंसलाल वर्मा (28, रा. परतवाणी, जि. बलोदा बाजार, छत्तीसगढ) अशी जखमींची नावे आहेत. शिवप्रसाद धूर्वे (28, रा. छत्तीसगढ) असे हल्ला करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास लक्ष्मीपुरा येथे चारकामगार पत्ते खेळत होते. दरम्यान खेळण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. दरम्यान शिवप्रसादयाने सखाराम, त्याचा लहान भाऊ जोधिया आणि संजय या तिघांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये सखाराम याच्या छातीवर डाव्याबाजूला चाकूचा गंभीर वार झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. तर जोधिया आणि संजय हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.