डोक्यात फक्त सरकार पडण्याचे विचार : धनंजय मुंडे

0

अहमदनगर : राज्यातील सरकार मजबूत असून वर्षपूर्ती केली आहे. मात्र विरोधी पक्ष राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे सांगत आहे. यांच्या डोक्यात फक्त सरकार पडण्याचे विचार येतात, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे.

औरंगाबाद येथून आष्टी (जि. बीड) येथे जात असताना मंत्री मुंडे हे नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करताना मुंडे म्हणाले, सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्ष असे आम्ही एकरूप असून महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करीत आहोत. महाराष्ट्रात जी विकासकामे दिसतात, त्या सर्व कामांचे श्रेय सरकारमधील तिन्ही पक्षांचे आहे.

विरोधी पक्ष आम्ही केलेल्या चांगल्या कामाला चांगले कधी म्हणणार नाही. कारण, ते विरोधी पक्षाचे कामच आहे. विरोधी पक्ष हा आमच्यावर कायम टीका करणार आहे. ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्या दिवसापासून विरोधी पक्ष टीकाच करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.