अर्शद वारसी म्हणाला ,”मुन्नाभाई-३ येणं शक्य नाही. कारण…”

0

मुंबई ः मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अर्शद वारसी आणि संजय दत्त यांची जोडी पुन्हा नव्याने मुन्नाभाईचा तिसऱ्या भागात दिसणार का, याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. यावर अर्शद वारसी पहिल्यांदा बोलला आहे. ट

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अर्शद वारसी मजेत म्हणतो की, ”मुन्नाभाई ३ येण्याची शक्यता कमी आहे. पण असं काहीही होणार नाही. मला वाटतं तुम्ही विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांना भेटून या चित्रपटावर काम सुरू करण्यासाठी सांगायला हवं. मात्र, राजकुमार हिरानी अनेक प्रोजक्टमध्ये व्यस्त आहेत, ती आमच्यासाठी दुःखत बाब आहे.”

अर्शद पुढे सांगतो की, “लोकांना जे आवडतं ते करण्याचा इच्छा आहे. आपण तेच चित्रपट पाहतो जे आपल्याला आवडतात. लोकांना जे काही पाहिजे आहे, त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि मी तसे काम करत असलो तरी त्यात काहीही वावगे नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.