शेतकऱ्यांना सरकारने डांबून ठेवले आहे ः राजू शेट्टी 

0

सांगली ः ”कृषी कायद्याला भाजपाशासित राज्यांचाही विरोध आहे. भाजपाशासित राज्यातील शेतकरीदेखील २६ नोव्हेंबरला आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्ली गेले होते. परंतु, केंद्र सरकारने डांबून ठेवेले आहे”, असा आरोप शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केंद्रावर केला आहे.

सांगलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ”शेतकरी संघटनेने ८ डिसेंबर पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अग्रभागी असेल. शेतकरी आंदोलनात खलिस्तान शिरल्याचा अप्रचार करून प्रांतवाद पसरला जात आहे. शेतकरी अतिरेकी आहेत का? या आंदोलनाला वेगळे देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे”, असे मत राजू शेट्टी यांनी मांडली.

मागील ९-१० दिवसांपासून चिवटपणे केंद्राच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली आंदोलन छेडले आहे. केंद्राने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात हजेरी लावलेली आहे. केंद्राने आतापर्यंत चार वेळा बैठका घेतल्या, मात्र त्यामध्ये यश आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.