”…तर देवेंद्र फडणवीससुद्धा शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील”

0

मुंबई ः शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी घोषीत केलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. महाविकास आघाडीची भूमिका ही दुटप्पी आहे, अशी टीका फडणवीसांनी केल्यांनतर राऊत म्हणाले की, ”१० वर्षांपूर्वीचं बोलू नका. शिवसेना, राष्ट्रवादी किंवा तृणमूल काॅंग्रेसने आवाहन केलं म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरला नाही. त्यांच्या कोणाच्याही हातात राजकीय झेंडा नाही, हे विरोधी पक्षनेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज शेतकरी आपल्या स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे, याता विचार फडवीसांनी जरी केला तरी ते शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील”, असे प्रतिउत्तर संजय राऊत यांनी दिले.

मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.