रावसाहेब दानवेंचा डीएनए तपासणं गरजेचं : बच्चू कडू

0

मुंबई ः ”देशभरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून त्या आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात आहे, असं म्हणणं शेतकऱ्यांचा अपमान आहे. रावसाहेब दानवे हिंदुस्तानचे आहेत की, पाकिस्तानचे आहेत यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे”, अशी प्रतिटीका बच्चू कडू यांनी केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन व पाकिस्तानचा यामागे हात आहे, असे विधान शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी केले होते.

दानवे पुढे म्हणाले होते की, ”पहिल्यांदा या देशातील मुस्लीमांना उचकवलं आणि सांगितलं की सीएए व एलआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावे लागेल. एखादा तरी मुस्लीम बाहेर गेला का?”, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यांवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संपात व्यक्त करत रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.