यूपीच्या गेटवर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जाट मोठ्या संख्येने

0

नवी दिल्ली ः दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन तीव्र रुप धारण घेत आणि केंद्राने शेतकऱ्यांसाठी  वापरलेले नवनवे फंडे नाकामी ठरत आहेत. नाताळा, शनिवार आणि रविवार सगलपणे सुट्टी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या गेटवर मोठ्या संख्येने जाट शेतकरी पोहोचलेले आहेत. त्यामुळे पोलीस सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.

यासंबंधी सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी बैठक घेऊन विविध राज्यांतील शेतकऱ्यांना आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान, मंत्री आणि खासदारांना पत्र लिहून हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, अशी विनंती शेतकरी संघटना करणार आहेत, असा निर्णय किसान मोर्चाने घेतला आहे.

मुराबाबादमधील इकरोटिया प्लाझावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी नेते राकेश टिकेत म्हणाले की, “हे कायदे केवळ उद्योगपतींच्या सेवेसाठी मोदींनी तयार केलेले आहेत. धान्यांची साठेबाजी करण्यासाठी हे मोठे उद्योगपती पहिल्यांदा गोदामे भरतात आणि नंतर हे कायदे शेतकऱ्यांनर लादले जातात. यातून मोदींची नीती स्पष्ट होते”, अशी टीका त्यांनी मोदींवर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.