बाळासाहेब थोरात म्हणाले, “छ. संभाजी महाराजांचा नावाचा वापर करून राजकारण खेळू नये”

0

मुंबई ः “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, अशा आशयाचे ट्विट काॅंग्रेसचे प्रदेशाध्य बाळासाहेब थोरात यांनी केलेले आहे.

“माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”, असेदेखील ट्विट करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

“छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया”, असेही ट्विट त्यांनी केलेले आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावे, या मागणीला काॅंग्रेसचा विरोध आहे. खरंतर ही मागणी पूर्वीपासूनच शिवसेनेची आहे. अशा पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला नाटकी असे संबोधले आहे. त्यात आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काॅंग्रेसचा नामांतराला विरोध आहे, असे निक्षूण सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.