महाविकास आघाडीचे सरकार हे थापाडे ः केशव उपाध्ये 

0

मुंबई ः “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर थपडा मिळत आहेत. तसेच जनतेला राज्यातील आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असता हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे”, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्य यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

उपाध्ये यांनी ट्विटरद्वारे सविस्तर सांगितले की, “न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ते मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती संख्या वाढतेच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पद्धतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशीर ठरविण्याचा काल आलेला निर्णय, त्याशिवाय पदवीपरिक्षा, ग्रामपंचायत प्रशासक नेमणूक, मेट्रोकारशेड, अर्णव गोस्वामी, कंगना प्रकरणात न्यायालयाकडून सरकारला मिळालेल्या थपडा तसेच मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आलेलेअपयश ही सुध्दा थप्पडच आहे”, अशी टीका केवश उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

“एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र सरकारच्या फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात  सवलत देण्याच्या सरकारकडून फक्त थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकरी धार्जिण्या करू. मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा जनतेला देत असलेल्या थापांची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळखही थापाडे सरकार हीच आहे”, अशी सडकून टीका उपाध्ये यांनी सरकारवर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.