प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात भाजप शून्यावर

0

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर गावात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाटील यांच्या गावात शिवसेनेने बाजी मारत विजय मिळवला आहे.

खानापूर गावात भाजपची सत्ता होती. या निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेना उतरली. मात्र भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबरच आघाडी केली. भाजपला पडण्यासाठी आमदार आबीटकर यांनी जोर लावला.

खानापूरमध्ये नऊ पैकी सहा जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे तर, विरोधी आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या गावातच भाजपला एकही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक निकालांत ही सर्वांत मोठी हार समजली जात आहे.

आमदार आबीटकर यांना थेट पक्ष नेतृत्वाकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आबीटकर यांचे खास अभिनंदन केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या गावातील विजय शिवसेनेसाठी अगदी खास असल्याचेच यावरून दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.