‘तांडव’ प्रकरणाच्या तपासासाठी उत्तर प्रदेश पोलीस मुंबईत

0
मुंबई :अभिनेता सैफ अली खानची वेबसिरीज तांडव वरुन वादंग उठले असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी तांडवविरोधात तक्रार दाखल झालेली आहे. आता उत्तर प्रदेश पोलीसही या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेबसिरीजविरोधातील वाढता तणाव लक्षात घेत अलीकडेच जाहीर माफी मागितली होती. मात्र, तरीही हा वाद काही थांबण्याचे चिन्ह नाहीत.

‘तांडव’विरोधात अनेक राज्यात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी ‘तांडव’चे निर्माता व दिग्दर्शकांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळं ‘तांडव’च्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

‘मुंबई पोलिसांकडून आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य मिळतंय, ‘तांडव’ प्रकरणी अद्याप कुणाचीही चौकशी झालेली नाहीये’, असं उत्तर प्रदेशचे पोलिस अधिकारी अनिल सिंह यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.