बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

0

मुंबई कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड शांततापूर्ण मार्गाने काढली होती. या दरम्यान सरकारकडून शेतकरी आंदोलन बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.

शेतकरी मागील बऱ्याच दिवसांपासून शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करत आहेत. पण, बळाचा वापर करत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील असं सूचक विधान त्यांनी आपल्या ट्विटमधून केलं. देशानं धुमसणारा पंजाब पाहिला आहे, तीच परिस्थिती आता पुन्हा उदभवू देवू नका असा इशाराच त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी आणि ट्रॅक्टरचा सहभाग असणार याची अपेक्षा असूनही चर्चा करून या गोष्टी वेळीच थांबवता आल्या असत्या. पण, तसं काहीही झालं नाही, अशा शब्दांत केंद्रावर ताशेरे ओढत आपण दिल्लीतील घटनेचं समर्थन करत नसून सर्वांनीच या परिस्थितीमागच्या कारणांचा विचार करायला हवा ही बाब अधोरेखित केली.

देशातील बळीराजा जेव्हा एखादी मागणी करतो तेव्हा त्याचा विचार केला गेलाच पाहिजे, असं म्हणत या परिस्थितीमध्ये केंद्राची नेमकी काय भूमिका असणं अपेक्षित होतं यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. केंद्रानं कृषी कायदे थेट मंजूर केले तेव्हापासून या साऱ्याची प्रतिक्रिया उमटणार असं आपल्याला वाटलंच होतं असं म्हणत पवारांनी दिल्लीतील हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत केंद्राच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.