विराट कोहली होतोय सोशल मीडियावर ट्रोल

0

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलाम केला. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात टीम इंडियाच्या विजयाला प्रेरणादायी म्हटलं. पंतप्रधानांनी केलेल्या या प्रशंसेनंतर विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.

विराट कोहलीनं पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या प्रशंसेच्या ट्विटवर तिरंग्याची इमोजी कमेंट केली. याचनंतर कोहली ट्रोल होऊ लागला. पीएमओ या ट्विट हँडलवरुन पंतप्रधानांनी केलेलं हे भाष्य ट्विट करण्यात आलं.

यामध्ये लिहिलं होतं, की या महिन्यात क्रिकेट पिचवरुन खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या संघानं सुरुवातीच्या अडचणींनंतर शानदार वापसी करत ऑस्ट्रेलियामध्ये सीरिज जिंकली. आपल्या खेळाडूंचे परिश्रम आणि टीम वर्क प्रेरित करणारं होतं. विराट कोहलीनं या ट्विटवर तिरंग्याची इमोजी पोस्ट केली. यानंतर चाहत्यांनी त्याला या विजयात त्याचा सहभाग नसल्याचं सांगत ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका चाहत्यानं असंही म्हटलं, की हा विजय अजिंक्य रहाणे कर्णधार असताना मिळाला आहे. तुम्ही याचं श्रेय घेऊ नका. तर एकानं असंही म्हटलं, की विराट कोहली तुम्ही यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.