मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघात 5 जणांचा मृत्यू, पाच जखमी

मृतात नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यासह घरातील चौघांचा समावेश

0

नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खालापूर टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात नवी मुंबई महापालिका अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह कुटुंबातील 4 जणांसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. 3 महिला, 1 लहान मूल व एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मध्यरात्री दीच्या सुमारास खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. वेगातील ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रेलर पुढे चाललेल्या 4 गाड्यांवर आदळला. ट्रेलर सह क्रेटा, इनोव्हा , टेम्पो , ट्रक या अपघात ग्रस्त वाहनांचे नुकसान झाले आहे.

या अपघातात दोन कार मधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होते, परतताना हा अपघात झाला आहे.

डॉ. वैभव वसंत झुंझारे (४१, नेरुळ, नवी मुंबई), उषा वसंत झुंझारे (६३, नेरुळ, नवी मुंबई), वैशाली वैभव झुंझारे (३८, नेरुळ, नवी मुंबई), श्रिया वैभव झुंझारे, (५, नेरुळ, नवी मुंबई), मंजू प्रकाश नाहर (५८, गोरेगाव) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नील सोनाजी कांबळे (३०,गोरेगाव), प्रकाश हेमराज नाहर (६५, गोरेगाव), अर्णव वैभव झुंझारे (११, नेरुळ, नवी मुंबई), किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट हे जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.