तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

0

मुंबई : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना आज घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 50 ते 60 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. भिवंडीच्या वलपाडा परिसरात ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफची टीम, पोलिस पोहचलेत. त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्याचे समजते.

भिवंडतील्या कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कंपाउंडमध्ये आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास जी-2 ही इमारत कोसळली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साधारण तीन ते चार कुटुंब राहत होते. खालच्या मजल्यात कामगार काम करत होते. हे सारे जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या अग्निशमन दल, एनडीआरएफच्या तुकडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.