पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील एक टन द्राक्षे गायब?

आमलिका एकादशीनिमित्त पुण्यातील भाविकांनी केली होती द्राक्षांची आरस

0

पंढरपूर : दरवर्षी आमलिका एकादशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. आमलिका एकादशी निमित्त पुणेयेथील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल टन द्राक्षांची सजावट केली. आजच्या आमलिका एकादशी निमित्त विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चौखांबीमध्ये टन द्राक्ष वापरून मनमोहक अशी आरास करण्यात आली होती.

बाबासाहेब रामचंद्र शेंडे (बारामती), पुनम बाबासाहेब शेंडे (बारामती), सचिन आण्णा चव्हाण (पुणे) यांनी टन द्राक्षे मंदिरालाआराससाठी दान दिले होते. पण केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाली. यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात वेगवेगळ्या चर्चांनासुरुवात झाली आहे. आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरू झाले आणि अर्ध्या तासात टन द्राक्षापैकी एकहीमणी शिल्लक राहिला नव्हता.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी आमलिका एकादशी निमित्त सकाळी सहा वाजता टन द्राक्षाची आरास करण्यात आली. आरासकेल्यानंतर मात्र अवघ्या अर्ध्या तासात ही सर्व द्राक्ष मंदीरातून गायब झाली आहेत. ही द्राक्ष मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीनेल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. मात्र काही भाविकांनी कर्मचाऱ्यांनीच ही द्राक्ष नेल्याचा आरोप केला आहे. यामुळे नेमकंद्राक्ष कोणी नेली? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सणसमारंभ तसेच एकादशीच्या निमीत्ताने विविध प्रकारची आरास करण्यात येते. यापूर्वीफुलांची, अननसची आणि संत्र्याची आरास करण्यात आली होती. ही फळांची आरास दिवसभर ठेवली जाते जेणेकरून भाविकांना तीपाहाता येईल. दुसऱ्या दिवशी आरासची फळे भाविकांना दिली जातात. आजही द्राक्ष आरासनंतर भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारहोती. मात्र आरास केल्याच्या अर्ध्या तासातच सर्व टन द्राक्ष गायब झाली. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.