धुक्यात रस्ता हरवल्याने अपघात; १३ जणांचा मृत्यू

0
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट असून, यामुळे पडलेल्या धुक्यात अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात १३जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे झाला आहे.

उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरु असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला.

या अपघातात १३ जणांचा जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.