राज्यात बर्ड प्लूचा फैलाव सुरू; २,३७८ पक्ष्यांचा मृत्यू

0

मुंबई : राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव सुरू असून, ८ जानेवारीपासून एकूण २ हजार ३७८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यात १४ जानेवारी रोजी लातूर येथे ४७, गोंदिया २५, चंद्रपूर ८६, नागपूर ११०, यवतमाळ १०, सातारा ५०, रायगड जिल्ह्यात ३ अशी ३३१ मृत पक्ष्यांची नोंद झाली.

सांगली जिल्ह्यात ३४, अमरावती व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी १ बगळा, पोपट, चिमण्या व वर्धा येथे ८ मोर अशा एकूण ४४ पक्ष्यांची आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. नाशिक जिल्ह्यात, यवतमाळ, नंदुरबार ६, पुणे २ व जळगाव जिल्ह्यात २ कावळ्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे एकूण ३८२ पक्षी मृत झाले.

मुंबई, घोडबंदर, दापोली व बीड येथे सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. ६६ नमुन्यांपैकी २२ अहवाल प्रलंबित असून ४४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कुक्कुटमध्ये ८ नमुने होकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड व नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच १३ नमुने नकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड, अकोला, अमरावती, अहमदनगर, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.