‘त्या’ शेतकऱ्याचा थंडीमुळे मृत्यू झाला का? 

0

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा तिकारी सीमेवर मृतदेह आढळून आलेला आहे. अजय मूर असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आलेले आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून दिल्लीतील थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या ३२ वर्षांचा युवक सोनिपत येथील असून कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. मागील अनेक दिवसांपासून तिकरी सीमेवर बाॅर्डरवर वास्तव्यास होता. त्या ठिकाणीच तो थंडीमध्ये झोपलेला असताना सकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.