शेतकऱ्यांना पाठिंबा देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ः संजय राऊत 

0

मुंबई ः ”संपूर्ण देशातून माहीत घेतली तर, जिथं भाजपाचे सरकार आहेत तिथेही भारत बंदला आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. हा बंद राजकीय नाही तर, भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. तो स्वच्छेने, स्वयंस्पूर्तीने ज्याच्या कष्टाचं आपण खातो त्याच्यासाठी आहे. जो शेतकरी व कष्टकरी शेतावर राबत आहे, त्याचे काही प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल काही मतभेद असू शकतील, पण, मागील १२ दिवसांपासून दिल्लीतील कडाक्याच्या थंडीची आणि सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी देशाच्या सीमेवर संघर्ष करतो आहे. त्याला पाठिंबा देणं जगातल्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे,”असे मत खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.