भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले

0

मुंबई : शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत आहेत. तसेच त्यांच्या हेलिपॅडला परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

“अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या काड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? हा प्रश्न आहे. 2009 मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता”, याची आठवणही पटोले यांनी करून दिली.

“राज्यात आणि देशात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपनेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला”, असाही घणाघात पटोले यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.