कमल हसन म्हणाले,”देशातील अर्धी जनता उपाशी…”

0

नवी दिल्ली ः ”अर्धा देश उपाशी झोपतो आहे. करोनामुळे लोकांनी आपली कामे गमवली आहेत अशा परिस्थतीत एक हजार कोटीं रुपयांचे संसद भवनाची काय गरज होती?”, अशी टीका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

कमल हसन पुढे म्हणाले की, ”चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांच्या देशातील लोकांनी ही भिंत तुमच्या रक्षणासाठी आहे, असं सांगितले होते. आता माझा प्रश्न आहे मोदींना की, तुम्ही कुणाच्या सरंक्षणासाठी नवं संसद बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी प्रश्नांचं उत्तर द्यावं”, असं कमल हसन यांनी म्हटलं आहे.

तामिळनाडू २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हसन यांनी निवडणुकीच्या प्रसाराला सुरूवात केली आहे. मोदींनी उभा केलेल्या संसदेवरून कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.