मारुंजी गावाची ओळख ‘हायटेक व्हिलेज’ बनवणार

0

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क म्हणून ओळख असणाऱ्या परिसरातील मारुंजी गावाची ओळखही ‘हायटेक व्हिलेज’ बनवायची असल्याचे मत जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून सुशिक्षित उमेदवारांनी व्यक्त केले. तसेच वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्व नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या रिंगणात जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून सुशिक्षित आणि तरुण उमेदवार अर्जुन बाबुराव बुचडे, कावेरी संदीप बुचडे, दत्तात्रय तुकाराम सुतार उभा आहेत.

गावच्या विकासासाठी खासकरून महिलांना भेडसावणारे प्रश्न, मुबलक पाणी, प्रशस्त रस्ते, चोवीस तास वीज, शिक्षणासाठी आद्यवात सुविधा असणारी शाळा,  स्वच्छ गाव याच बरोबर गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी नवीन योजना प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करून त्यातुन रोजगानिर्मिती करु असे आश्वासन जय हनुमान पॅनलच्या उमेदवारांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.