राज्यमंत्री बच्चू कडू तिसऱ्यांदा विलगीकरणात

0
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आहे तर काही निर्बंध कडक करण्यात आले आहे. दरम्यान रात्रीची संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. अनेकांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होत असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पुन्हा एकदा विलगीकरणात राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

यापूर्वी बच्चू कडू यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे.

ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना बच्चू कडू म्हणाले की मला न विचारता पुढील तीन दिवस कोणीही भेटायला येऊ नये. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने अँटिजेन टेस्ट केली असून ती निगेटिव्ह आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्याने पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे, असेहि ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.