मालकाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन तरुणांचा खून

करंजविहीरे, खेड येथील धक्कादायक प्रकार

0
चाकण : वीट भट्टीवर कामावर असणाऱ्या मुलाने मालकाच्या मुलीला पळवून नेले. याचा राग मनात धरून मालकाने दोघांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे.
बाळू सिताराम गावडे (26, रा. आसखेड खुर्द, तालुका खेड, जिल्हा, पुणे) आणि राहुल दत्तात्रय गावडे (28, रा.आसखेड खुर्द) या दोघांचा खून झाला आहे. तर अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, सौ चंद्र करा उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव (रा करंजविहीरे), बाळू मरगज हॉटेल मालक या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे करंजविहीरे, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे बाळू मरगज यांचे
हॉटेल माणुसकी आहे. तसेच त्यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर काम करणारे कामगार बाळू सिताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे यांनी हॉटेल मालक यांच्या मुलीला पळून घेऊन गेले होते.
यातून मालकाने बाळू, राहुल व मुलीला हॉटेल माणुसकी येथे आणले. तिथे बाळू आणि राहुल या दोघांना लाकडी काठी, लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. चाकण पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.