नवी दिल्ली ः ”देशातील करोनाची साखळी तोडण्यात यश आलं आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांला लस देण्याची गरज पडणार नाही”, अशी अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष बलराज भार्गवा यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाल की, ”मी आधी स्पष्ट करतो की, देशभरात लसीकरण करण्यात येईल, असं सरकारनं कधीही म्हटलेलं नाही.” त्यानंतर भार्गवा म्हणाले की, ”आपला उद्देश करोनाची साखळी तोडण्यावर आहे. लसीकरण लसीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. जर आपण गंभीर लोकांचे लसीकरण करण्यास आणि विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आपल्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याती गरज नाही.”
जगभरात करोनाच्या लसीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पुढल्या वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात लस येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यासंदर्भात अनेक दौरे केलेले आहेत.