अन्यथा ही शहरे पाण्याखाली जाणार….वाचा सविस्तर

0
नवी दिल्ली : जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. शतकाच्या अखेरीस ही शहरं ३ फूट पाण्यात असतील असं सांगण्यात आलं आहे. २००६ ते २०१८ या कालावधीत जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे ३.७ मिलीमीटर दराने वाढत आहे.
अंतराळ संशोधन संस्था नासानं आयपीसीसीच्या अहवालाचं मूल्यांकन केलं आहे. त्यानंतर भारतातील १२ शहरात शतकाच्या शेवटी पाण्याची वाढती पातळी जाणवण्याची शक्यता आहे. यापूर्वी १०० वर्षात असे बदल होत होते. मात्र २०५० नंतर दर सहा ते नऊ वर्षांनी असे बदल दिसतील असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. “२१ व्या शतकात समुद्राच्या पातळीत सतत वाढ होताना दिसेल. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी येण्याच्या घटना वाढतील. यापूर्वी १०० वर्षात असे बदल होत होते”, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
शतकाच्या अखेरीस किनारपट्टीवरील ‘या’ शहरांना धोका!
कांडला- १.८७ फूट
ओखा- १.९६ फूट
भावनगर- २.७० फूट
मुंबई- १.९० फूट
मोरमोगाओ- २.०६ फूट
मँगलोर- १.८७ फूट
कोचिन- २.३२ फूट
पारादीप- १.९३ फूट
खिडीरपूर- ०.४९ फूट
विशाखापट्टणम- १.७७ फूट
चेन्नई- १.८७ फूट
तुतीकोरीन- १.९ फूट
आयपीसीसी १९८८ पासून दर पाच ते सात वर्षांनी पृथ्वीच्या हवामान बदलाचं मूल्यमापन करते. यात तापमान, बर्फाचे आवरण, वायू उत्सर्जन आणि समुद्राच्या पाणी पातळीवर लक्ष केंद्रीत केलं जातं. दुसरीकडे हिमालयातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली असून डोंगरावरील बर्फाचं आवरण कमी होत आहे. १९७० पासून हिमालयातून उगम पावलेल्या नद्यांही आकुंचन पावत असल्याचं, कृष्णा अच्युत राव यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.