मुंबईतील दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख

मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतीचीही घोषणा

0
नवी दिल्ली : मुंबईत एका रात्रीत दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतीचीही घोषणा केली आहे.
मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्यानं झालेल्या जीवितहानीमुळे दु: खी झालो. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना.

 

तसंच मोदींनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. या मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर यात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.