‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्यांना साष्टांग दंडवत ः शेट्टी

0

‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्यांना साष्टांग दंडवत ः शेट्टी

मुंबई ः ”सकाळपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. रास्ता रोको आंदोलन केलं नव्हतं तरी लोकांना रस्त्यावर येण्याचं टाळलं आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग सर्व भागात बंद कडकडीत पाळण्यात आला आहे. समाजातील सर्व घटक आंदोलनात सभागी झाल्या आहे. आम्ही खऱ्या अर्थाने अन्नदात्याशी एकनिष्ठ आहोत, हे सर्वांनी दाखवून दिले आहे. मी सर्वांना साष्टांग दंडवत घालतो. यातून शेतकरी एकटा नाही, हे पाहायला मिळाले”, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांनी मांडले.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलकांनी जाहीर केलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.