राहूल गांधी म्हणाले, ”मोदीजी शेतकऱ्यांकडून चोरी बंद करा”

0

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनातील भारत बंदला समर्थन देत काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून मोदींवर हल्ला चढवला आहे. राहूल गांधी म्हणाले की, ”मोदीजी शेतकऱ्यांकडून चोरी बंद करा. भारत बंदला समर्थन देऊन अन्नदात्याचा संघर्ष यशस्वी करा”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.