राणेंनी फक्त मिटक्‍या मारत बसावे : राऊत

किमान शंभर जणांची नावं देतो; ईडीने चौकशी करावी

0

रत्नागिरी :  राणेंनी फक्त मिटक्‍या मारत बसावे. त्यांना सत्ता काय किंवा सत्तेतील सहभाग काय, आता या आयुष्यात मिळणं शक्‍य नाही. गद्दारीवर राणेंनी बोलावे यासारखा राजकारणातला दुसरा विनोद नाही, असे मत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.


शिवसेनेबरोबर केलेली गद्दारी, काँग्रेसबरोबर केलेली गद्दारी, त्याशिवाय देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शहा असोत, यांना त्यांनी घाणेरड्या शब्दांत फटकारले आहे. हेसुद्धा कधीतरी देवेंद्र फडणवीस यांनी काढून वाचलं तर खूप बरं होईल.

चौकशी करायची असेल तर ईडीने नारायण राणेंच्या संपत्तीची चौकशी करावी. भाजपच्या किमान शंभर जणांची नावं आम्ही देऊ शकतो. ईडीने त्यांची चौकशी करण्याची आवश्‍यकता आहे. आता भ्रष्टाचार बाहेर यायला सुरवात झाली आहे. हायब्रीड अम्युनिटी या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये रस्त्यांच्या संदर्भात झालेला महाभ्रष्टाचार घोटाळा हादेखील आम्ही समोर आणला आहे. त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार.’’

“सत्तेसाठी हपापलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची मंडळी सत्ता न मिळाल्यामुळे सैरभैर होऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. असं वाटत होतं की, सत्तेच्या खुर्चीवर आपण चिकटून बसू; पण त्यांच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्रातील सुदैवाने तसं घडले नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.