रोहिणी खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका

0

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक झाले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

ओबीसी नेत्यांचा नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता? अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना प्रश्न केला आहे.

खरंतर, जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजप फक्त ओबीसीचा उमेदवार देईल, असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यावर रोहिणी खडसे यांनी त्यांना प्रत्युत्तर केलं आहे.

रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच फडणवीसांवर टीका केली असून यासंबंधी त्यांनी एक ट्वीटदेखील केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहलं की, ‘भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.’

Leave A Reply

Your email address will not be published.