संजय राऊत म्हणाले, “दानवेंनी पुरावे द्यावेत…” 

0

मुंबई ः “जर केंद्रीय मंत्र्याला शेतकरी आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात असल्याचा सुगावा लागला असेल, तर त्यांनी संरक्षण मंत्र्यांना तातडीने माहिती द्यावी. त्याचबरोबर लगेचच पाक आणि चीनवर सर्जिकल स्ट्राइक करावा. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री  आणि सैन्य दलाच्या प्रमुखांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा”,  अशी टीका खासदार संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्यातील राजकारणातील वातावरण तापलं आहे.  दानवे यांच्यावर  राज्यमंत्री बच्चू कडू यांनी टीका केली, त्यांनतर शिवसेनेचे खासदार यांनीदेखील त्यांच्यावर टीका केलेली आहे.

रावसाहेब दानवे काय म्हणाले…

”आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन व पाकिस्तानचा यामागे हात आहे. पहिल्यांदा या देशातील मुस्लीमांना उचकवलं आणि सांगितलं की सीएए व एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावे लागेल. एखादा तरी मुस्लीम बाहेर गेला का?”, असे विधान शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी रावसाहेब दावनेंनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.