चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ व्यक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रतिउत्तर

0

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात असा टोला संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.

राज ठाकरे यांनी मुंबई पालिका निवडणुकीसाठी घाई करु नये असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, “माझंही तेच म्हणणं आहे. विरोधी पक्ष उगाच घाई का करत आहे. अशा प्रकारचे निर्णय होत असल्याचं त्यांना कोण सांगत आहे. जर त्यांच्या गुप्तहेरांनी बातमी दिली असेल तर ते चुकीची बातमी देत आहेत. असं काही नाही. काही करायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त सांगतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करता

“देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन वर्ष टीकाच करायची आहे. विरोधी पक्षनेत्यांचं कामच आहे सत्ताधारी नेते, मंत्री यांच्यावर टीका करणं. लोकशाहीत ही टीका स्वीकारली पाहिजे. त्यांनी काय टीका केली माहिती नाही, पण त्यांनी करोना संकटात महागाई, वादळ. मदत योजना यासंदर्भात बोललं पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.