मराठ्यांची “राजधानी सातारा” …शिवभक्ताने उभारला महाराजांचा पुतळा

0

सातारा : जिल्ह्यातील वेळे गावाजवळ एका शिवभक्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा  उभारला आहे. मराठ्यांची “राजधानी सातारा” या नावाने शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर भव्य सेल्फी पॉइंट उभारुन मराठ्यांच्या राजधानीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आणलेय.

सातारा जिल्हयातील वेळे गावाजवळ रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा, हा या मागचा उद्देश आहे.

मुंबईपासून बेंगलोर पर्यंत जवळपास एक हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर एकमेव असा पन्नास फुटी अश्वारुढ पुतळा साताऱ्यातील  वेळे गावात उभारला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी शिवभकत् गर्दी करत आहेत.

शिवभक्तांसाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंटचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण राहावी असा आहे. या महामार्गावरुन येणाऱ्या शिवभक्तांना महाराजांचा इतिहास कायम स्मरणात राहावा यासाठी हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले यांनी या सेल्फी पॉईंटचे अनावरण केले. या वेळी बोलताना उदयनराजेंनी या सेल्फी पॉईंटच अनावरण करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असं सांगितलं. या सेल्फी पॉईंट मुळे सातारा जिल्ह्याचा इतिहास कानाकोपऱ्यात पसरणार असून जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.