‘शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला’ ! शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय…’ : रामदास कदम

0

मुंबई : गेली 52 वर्षे मी शिवसेनेसाठी झोकून देऊन काम केलं. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि दु:खदायी आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही. रात्री-अपरात्री मी झोपेतून उठून बसत आहे, अशा शब्दांत बंडखोर नेते रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास कदम हे एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी रामदास कदम अक्षरश: ढसाढसा रडले.

बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेनेची नाही, शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला, असं म्हटलं आहे. उद्धव साहेबांनी नोंद घेतली असती तर एकनाथ शिंदेंसह 51 आमदारांवर ही वेळच आली नसती. किती जणांची हकालपट्टी करणार त्यापेक्षा तुमच्या आजुबाजुला कोण आहे ते आधी पहा… कोण बैल म्हणतो, कोण, कुत्रे म्हणतोय मग आमदार चिडले… मी एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना बोललो… प्रयत्न केले पण यश आले नाही. मराठी माणूस जगला पाहिजे. शिवसेना जगली पाहिजे, आमच्यासारखा कडवा सैनिक का जातो? हे पाहिलं पाहिजे, असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. मी 52 वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केले. राज्यातील शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. मात्र, आज माझ्यावर शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हाता. आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, आयुष्याच्या संध्याकाळी पक्षाच्या माध्यमातून आमचं भविष्य अशाप्रकारे अंध:कारमय होईल असे वाटले नव्हते, असे कदम म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.