धक्कादायक…पोलिस सहकाऱ्याच्या शारीरिक व मानसिक त्रासातून महिला पोलिसाची आत्महत्या

0

पुणे : पोलिस सहकारी कर्मचाऱ्यांच्या त्रासाला वैतागून महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देलवडी  येथे उघडकीस आली आहे.

दिपाली बापुराव कदम (26 रा. देलवडी, सध्या लोकरी मणिकपूर वसई मुंबई) असे पोलीस नाईक पदावर सेवेत असणाऱ्या मयत महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. मयत दिपाली कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपला भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाल्मीक गजानन अहिरे (रा. पालघर, मुंबई) याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. दोन वर्षापूर्वी दिपाली कदम यांची पोलीस खात्यात असणाऱ्या वाल्मीक अहिरे याच्यासोबत ओळख झाली होती. यानंतर आरोपी अहिरे हा वारंवार दिपालीला शाऱीरिक व मानसिक त्रास देत होता.

दिपालीचे नुकतेच लग्न जमले होते. तसेच 31 ऑक्टोबर रोजी तिचा साखपुडा झाला होता. 16 नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. साखरपुडा आणि लग्नासाठी त्या आपल्या मुळगावी आल्या होत्या. दिपालीचे लग्न जमल्याचे समजल्यानंतर वाल्मीक अहिर याने तिच्या होणाऱ्या पतीला आणि त्यांच्या वडिलांना फोन करुन दिपाली संदर्भात माहिती दिली.

वाल्मीक अहिरे याने मंगळवारी (दि.2) रात्रीच्या सुमारास दिपालीचा भाऊ रोहितला फोन करुन तुम्ही तिचे इतर कोणाशी लग्न करु नका नाहीतर तुम्हाला मारुन टाकेल अशी धमकी दिली. मंगळवारी रात्री कुटुंबाने दिपालीला समजावून सांगितले. बुधवारी पहाटे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,
बारामतीचे अप्पर अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.