‘हे’ जिल्हे वाढवतायत राज्याचे ‘टेन्शन’

0
पुणेः राज्यातील अनेक जिल्ह्यात पहिली आणि दुसरी लाट  ओसरली आहे. मात्र सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांमध्ये उशिरा साथ सुरू झाल्यानेच या जिल्ह्यांमध्ये सध्या साथीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे राज्यात सध्या या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर असल्याचे समोर आले आहे.
‘साथ वाढण्यास पोषक स्थिती, हवामान, नागरिकांचा वाढणारा संपर्क, नियमांचे उल्लंघन; तसेच रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात उशिराने साथीचा प्रसार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई-पुणे आणि बऱ्याच शहरी भागांमध्ये गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पहिल्या लाटेचा प्रभाव असताना या जिल्ह्यांमध्ये पहिली लाटही ऑक्टोबर महिन्यात अधिक गंभीर होती. आत्ताही दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी मार्च-एप्रिलमध्ये साथीचा प्रभाव वाढला असताना, या जिल्ह्यांमध्ये जून, जुलै महिन्यात दुसरी लाट सुरू झाली. मोठ्या शहरांमध्ये सुरुवात पहिल्यांदा होते आणि त्यानंतर उशिरा दुसऱ्या शहरांमध्ये होत असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये दुसरी लाट उशिराने आली,’ असे निरीक्षण आरोग्य परिमंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय देशमुख यांनी नोंदविले.
‘करोनाच्या विषाणूची साथ गेल्या वर्षीपासून सुरू झाली. दळवळण मोठ्या प्रमाणात असलेल्या शहरांमध्ये साथीचा उद्रेक सर्वप्रथम होतो. त्यामुळे पुण्यातून या साथीला सुरुवात झाली. वाढलेले लसीकरण, अँटीबॉडी तयार झाल्याने; तसेच केलेला लॉकडाउन, रोग प्रतिकारशक्ती वाढत गेल्याने पुण्यातील साथ कमी होत गेली,’ असेही त्यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.