धनंजय मुंडे यांची बाजू घेत अमोल कोल्हेंनी भाजपावर साधला निशाणा

0

सांगली ः धनंजय मुंडे यांची बाजू घेत अमोल कोल्हे यांनी मौन सोडले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा करत आहेत तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असताना पाळली होती का”, अशी विचारणा राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे भाजपाला केली आहे.

सांगलीतील म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अमोल कोल्हे बोलत होते. कोल्हे पुढे म्हणाले की, “विरोधकांनी आता स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे. त्यांनी जर आरशात पाहिलं तर त्यांच्या मागण्या रास्त ठरतील असं वाटत नाही”, असा टोला कोल्हेंनी भाजपाला लगावला आहे.
धनंजय मुंडे यांनी होणाऱ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलेलं असून तेच यावर अधिक बोलतील, असंही सांगत अमोर कोल्हे यांनी औरंगबाद नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलेलं आहे. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ज्यांनी रायगडावर ढोल वाजवले, ज्यांनी महाराजाच्या गड किल्ल्यांवर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जी आर काढला. हे लोक आम्हाला आता शिवभक्ती शिकवणार का?”, असाही सवाल त्यांनी विरोधी पक्षाला विचारला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.