21 वर्षीय तरुणाने गावच्या राजकारणात केले परिवर्तन

0
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावात एका तरुणाने परिवर्तन केले आहे.

21 वर्षीय ऋतुराज रवींद्र देशमुख याने विरोधी उमेदवाराचा 38 मतांनी पराभव केला आहे. तसेच गावात उभा केलेलं त्याचे पॅनेल ही विजयी झाले आहे.

अगदी तालुक्यापर्यंत मला हरवण्यासाठी प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो, अशी प्रतिक्रिया ऋतुराजने दिली आहे.

आम्हा तरुणांना राजकारणापेक्षा गावच्या विकासात जास्त इंटरेस्ट आहे. जुन्या मंडळींना खुर्ची धरून ठेवण्यात रस जास्त आहे. आमचं तसं नाही, असं ऋतुराजने सांगितलं आहे.

ग्रामीण भागात उच्चशिक्षणासाठी शहरात गेलेली मुलं फारशी गावाकडे फिरकत नाहीत. ऋतुराज याला अपवाद ठरले. त्यांनी BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.