औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे : चंद्रकांत पाटील 

0
पुणे : स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे ही मागणी होती. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि या शहराचे नामांतर झालेच पाहिजे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी पुण्यात म्हणाले.
या देशात अजूनही औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली असली तरी  सत्तेत असलेली शिवसेना याबाबत आपली कोणतीही भूमिका स्पष्ट करता करताना दिसत नाही.
काही महिन्यापूर्वी आपण औरंगाबाद शहरात गेलो असता औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर व्हावे असे म्हटले असता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये माझ्यावर अत्यंत  गलिच्छ अशा शब्दात अग्रलेख लिहिला गेला होता, असेही पाटील म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.