राज्यातील पोलीसच असुरक्षित : तीन महिन्यात तीस जणांवर हल्ला

0

मुंबई : राज्यातील पोलिसांवर गेल्या काही‎ दिवसांपासून हल्ले वाढत असून हा‎ प्रकार अत्यंत गंभीर आहे. गेल्या तीन‎ महिन्यांत ३० पोलिसांवर हल्ले झाल्याची‎ माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार‎ यांनी बुधवारी (ता. १५) विधानसभेत‎ दिली. या वाढत्या हल्ल्यांमुळे पोलिसांचे‎ मनोधैर्य कमी होत असून ते वाढवण्याची‎ गरज असल्याचे मत त्यांनी या वेळी‎ अधोरेखित केले.

 

पोलिसांवर हल्ले‎ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची‎ मागणी अजित पवार यांनी विधानसभेत‎ केली.‎ राज्यातील पोलिसांवरील वाढत्या‎ हल्ल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित‎ पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनच्या‎ माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. या वेळी‎ गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांवर‎ होत असलेल्या हल्ल्यांची त्यांनी यादीच‎ वाचून दाखवत सभागृहाचे लक्ष वेधले.‎

 

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी‎ पोलिस चोवीस तास कार्यरत असतात.‎ अनेक वेळा जिवाची पर्वा न करता ते‎ आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र‎ कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच‎ हल्ले होत आहेत.‎

पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू‎ नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर‎ न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल‎ करण्याची आवश्यकता आहे. या‎ हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची‎ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे‎ पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने‎ जरब बसवण्याची मागणी विरोधी पक्षनेते‎ अजित पवार यांनी केली. या चर्चेमध्ये‎ इतर सदस्यांनी ही सहभाग नाेंदवला‎ आणि यावर तातडीने कारवाईची‎ मागणीही त्यांनी केली.‎

Leave A Reply

Your email address will not be published.