सासू-सासऱ्यांपासून विभक्त राहण्याच्या पत्नीच्या हट्टापायी संसार झाला उद्धस्त

0

ठाणे : सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याच्या मागणीवरुन पत्नीच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण करून, खून करुन स्वतः पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाणे परिसरात घडली.।

पत्नी अश्विनी (व१८) हिचा निर्घृण खून करून पती आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती.

१६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते दुसऱ्यांच्या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे पुन्हा त्यांचा याच मुद्द्यावरून वाद झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी १० वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला. त्यावेळी या घराच्या छताचा पत्रा उचकटून स्थानिकांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी अश्विनी हीदेखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.

Leave A Reply

Your email address will not be published.