…तर जयंत पाटील भाजपामध्ये असते ः राणे

0

रत्नागिरी ः ”जर राज्यात आघाडीचं सरकार आलं नसतं तर, जयंत पाटील आज भाजपामध्ये दिसले असते. या संदर्भात जयंत पाटील यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही झाली होती”, असा धक्कादायक खुलासा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

आघाडी सरकारवर नारायण राणेंनी अनेक वक्तव्ये केली होती. त्याचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले होते की, ”गंजलेल्या तोफोतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं. त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही.” जयंत पाटील यांना प्रतिउत्तर देताना नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये भरविलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

राणे म्हणाले की, ”जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपूरमध्ये जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माहिती माझ्याकडे आहे ती माहिती मी तिथेच उघड करणार आहे”, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.