मुंबई ः नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अस्वस्थता लक्षात आल्यानेच मित्रपक्षांतील काही नेते भाजपा आमदार फुडणार असल्याचा अफवा पसरत आहेत”, असे फडणवीस यांनी सांगितले.
”बाळासाहेब सानप परतल्याने नव्या-जुन्याचा वाद होण्याचा संबंध प्रश्नच निर्माण होत नाही. सगळे एक दिलाने काम करतील. नाशिक हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. आगामी काळात भाजपचाच खासदार असेल”, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”काही गैरसमजामुळे बाळासाहेब सानप पक्षातून बाहेर पडले होते. हे गैरसमज आता दूर झाले आहेत. सानप यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पक्षाची जबाबदारी सोपवली जाईल. नाशिकमधील कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करावे.” बाळासाहेब सानप म्हणाले की, ”सगळे कार्यकर्ते एकोप्याने काम करतील”, अशी ग्वाही दिली.
फडणवीस म्हणाले की, ”इतर पक्षातून आमच्याकडे आलेले नेते अतिशय प्रगल्भ आहेत. या देशाचं नेतृत्व राहूल गांधी नाही तर, नरेंद्र मोदीच देऊ शकतात, याची त्यांनी खात्री आहे. राज्याच्या राजकारणाची दिशा त्यांना कळते. कोणीही पक्ष सोडणार नाही”, असेही मत त्यांनी मांडले.