‘अनलॉक बाबत यु टर्न’….राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत

0

मुंबई : राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक तासापूर्वी पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे जाहीर केले. मात्र ठाकरे सरकारने आपल्या निर्णयावरुन यू टर्न घेत राज्यातील निर्बंध हटवण्यात आलेले नाही, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा संसर्ग अद्यापही आपण पूर्णपणे थोपवलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रुप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करायचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.

राज्यातील निर्बंध (Restrictions) उठण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केल आहे. यापुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरवण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरवण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे.
जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल.
स्थानिक प्रशासनाकडून याविषयी माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतर अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे हे उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.