”उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही, देवेंद्रजींना सोबत…”

0

मुंबई ः मेट्रो कारशेडवरून राजकारण पुन्हा तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कारशेडबद्दल वक्तव्य केलं. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा सल्ला दिला आहे.

चंद्राकांत पाटील आपल्या ट्विटवरून असे म्हणाले की, ”टीम इंडिया असं समजून काम करा उद्धवजी, आताही वेळ आहे. आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते.. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले,

पुढे चंद्रकांत पाटील म्हणतात की,”तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे”, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.